मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर येऊन मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 150 नगरसेवक निवडणून आणण्याचे आव्हान ठेवले आहे. यातच आता मनसे आणि भाजप युती होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी तिखट शब्दात टोले हाणले आहेत. यावरून मनसेने देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
मनसेचे नेते गजानन काळे म्हणाले की, हिंदुत्व आणि मराठी टांगणीला ठेवून कधी काॅंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर झोंबाझोंबी तर कधी समाजवादी पक्ष आणि एमआयएम बरोबर आतून कडीकोंडे लावणारे आणि आता तर संभाजी ब्रिगेडची साथ घेणारे शिल्लक सेनेवाले मनसेला ज्ञान पाजवण्याचे उपदेश देत आहेत. आपलं ठेवायचे झाकून व दुसऱ्याचे बघायचे वाकून, घोर कलयुग असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र यावर अजूनही दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर मनसे देखील भाजपसोबत लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
“ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
दरम्यान. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु यावर आत्ताचं सांगणं कठिण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या मुद्यावर एकक्ष येत असतील ते हे नैसर्गिक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Read also
- काय सांगता…! “शिवा मोहोडांचा मिटकरींवर ‘एका रूपया’ मनहानीचा दावा”
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे