वर्धा : विदर्भासह अमरावतीमध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतपिकांचे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री आणि काॅंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली. अनेक मंडळ क्षेत्रात नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच नुकसान भरपाई देण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरीक व पशुधन पालकांना सरसकट मदत द्यावी. अन्यथा अधिक आक्रमतेने लढा उभारू असा इशारा सरकारला दिला आहे.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
अनेक मंडळ क्षेत्रात नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच नुकसान भरपाई देण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरीक व पशुधन पालकांना सरसकट मदत द्यावी. अन्यथा अधिक आक्रमतेने लढा उभारू असा इशारा सरकारला दिला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हा बँकेचे सुधाकरराव भारसाकळे, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, नितिन गोंडाने, नगरसेवक वैभव वानखडे, गणेशराव आरेकर, पंकज मोरे, सागर कलाने, निलेश गुहे वैकुंठ देशमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
दरम्यान, गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून राज्यात ठिकठिकाणी जोरदा पाऊस झालं आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे. तसेच काही ठिकाणी वादळी पावसाने वित्तहानी तसेच जिवितहानी देखील झाल्याने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील ठाकुर यांनी केली आहे.
Read also
- “अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा