नवी दिल्ली : जुन्या संसदत भवनाला आज केंद्र सरकारकडून शेवटचा निरोप देण्यात आला. त्यानंतर नव्या संसदेत आजपासून लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. परंतु पहिल्याच तासात महिला आरक्षण विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यामुळे मोठा गोंधळ पहिल्याच दिवशी दिसून आला. या गोंधळात कायदामंत्री अर्जून राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक सादर केलं.
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
नव्या संसदेत भवनात भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळख करून दिली. यावेळी मोदी म्हणाले की, याच्या आधी काही प्रयत्न झाले. 1996 मध्ये पहिल्यांदा हे विधेयक आणले गेले. अटलजींच्या काळात तर कित्येकवेळा हा प्रयत्न झाला. पण ते आकडे जमवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पण अशा अनेक पवित्र कामांसाठी कदाचित परमेश्वरानं माझी निवड केली आहे.
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
महिला आरक्षणाच्या विधेयकावर पंतप्रधानांचं संसदेत विधान केल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावर आक्षेप नोंदवला. तसेच महिला आरक्षण विधेयकाबाबत त्यांनी जुन्या काळातील नोंदींचा संदर्भ दिला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर हस्तक्षेप केल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी सादर केला.
READ ALSO :
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?