कोल्हापूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. भोंग्यांच्या मुद्यावरुन सध्या राज्याती वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार आणि एका आमदारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं कायदा मोडणाऱ्यांना साथ देणं बंद करावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर; १२ दिवसांनी कोठडीतून होणार सुटका..
दरम्यान, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. त्याचे पालन करावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंवर महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करुन लाउडस्पीकर वापर करणाऱ्यांवर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
“राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली”
आघाडी सरकारची भूमिका ही कायद्याचे राज्य उल्लंघन आणि संविधानाची अपमान करणारी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजकता निर्माण करण्यासारखे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीने संविधानाचा आदर केला पाहिजे, तसेच कायद्याचे पालन करुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
Read also:
- ‘पुन्हा एकदा राजकारणासाठी भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिला’
- “उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य…”; फडणवीसांनी केला खुलासा..
- “पिंपरी-चिंचवड भाजपाचा निर्धार ‘अब की बार १०० पार’!”; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमदार लांडगेंची पहिली प्रतिक्रिया
- “अजान दिली तर हनुमान चालिसा लावली जाणारच”; राज ठाकरे अजूनही निर्णयावर ठाम
- ‘खरी समस्या भोंगे नाही, त्यांना संपवण्याची हीच वेळ’; नितेश राणेंची दुसरी मागणी
- राज्यभरातून मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी