मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली होती. या घटनेचे पडसाद संपुर्ण राज्यभरात उमटले होते. त्यानंतर जालना जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं निलंबन करण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच त्यांच पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. यातच आता त्यांच्या सक्तीच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
तुषार दोषी यांना निलंबित करण्याऐवजी त्यांची पुण्यात बदली केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनीही यावर संताप व्यक्त केला. मराठा आंदोलकांना मारल्याचे तुषार दोषी यांना बक्षीस मिळाले आहे. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेऊन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात ‘क्रिम पोस्ट’वर बदली मिळाली. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
दरम्यान, पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीसाठी त्यांना गृहखात्याने नेमकी शिक्षा दिली की प्रमोशन अशी चर्चा सुरू असताना आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती द्या अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतर मिळत नाही, केसरकरांचे हे पत्र मात्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे.
महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?
अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही.
त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की… pic.twitter.com/ECuspkGmpa
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस, नक्की कारण काय?
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,