पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फुट प्रकरणानंतर आता आमदार-खासदारांच्या निलंबणाची मागणी दोन्ही गटाकडून केली जात आहे. अशातच अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शरद पवार गटातील खासदारांना निलंबित करावे यासाठी मागणी केली आहे. विशेष करून अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलंय. यातच आता अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
शरद पवार गटातील खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, मोहम्मद फैजल, आणि श्रीनिवास पाटील यांना निलंबित करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. तर या पत्रात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळ्यात आलंय. त्यातच आता अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
यातच मागील काही कार्यक्रमांना अमोल कोल्हे अनुपस्थितीत असल्याने कोल्हे अजित पवार गटात प्रवेश करणार का ? अशाही चर्चा सुरू आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा मागील काही दिवसापासून रंगू लागल्या आहेत. त्यामुळेच अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार का ? असं तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
दरम्यान, सुरूवातीला अमोल कोल्हे अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राजभवनात हजर होते. त्यानंतर अमोल कोल्हे अजित पवार गटात दाखल झाले असल्याच्या बातम्या समोर येताच आपण शरद पवारांसोबतच असल्याचं सांगत कोल्हेंनी यावर पुर्णविराम दिला आहे. परंतु अमोल कोल्हे यांनी आपलं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटाकडे देखील सोपविले असल्याची माहिती समोर आली आहे. यातच अजित पवार गटाकडून देखील अमोल कोल्हे आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवर आता अमोल कोल्हे काय प्रतिक्रिया देणार? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, कोणी केली मोठी घोषणा ? राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…सतेज पाटील, मुश्रीफांकडून कारखानदारांवर दबाव, ऊस दरवाढीवरून राजु शेट्टींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
हेही वाचा…“३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, कुणी केली भविष्यवाणी ?
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?