नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू असतांनाच आता संसद भवनातही वाद सुरू झाला आहे. अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी शरद पवार गटाच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तर त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता शरद पवार गटातील चार खासदारांना निलंबित करण्यात यावे, यासाठी अजित पवार गटाकडून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे मागणी केली आहे. विशेष बाब म्हणजे शरद पवार गटातील काही खासदारांना यातून वगळ्यात आले असल्याने राजकीय वातावरण पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांची शरद पवार गटातील शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रफुल पटेल यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता शरद पवार गटातील राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, तसेच लोकसभेतील खासदार श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांना पत्र देखील दिलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”
विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून राज्यसभेचे खासदार शरद पवार तसेच लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचं नाव यातून वगळलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यातच सुरूवातीला अमोल कोल्हे अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राजभवनात हजर होते. त्यानंतर अमोल कोल्हे अजित पवार गटात दाखल झाले असल्याच्या बातम्या समोर येताच आपण शरद पवारांसोबतच असल्याचं सांगत कोल्हेंनी यावर पुर्णविराम दिला आहे. परंतु अमोल कोल्हे यांनी आपलं प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटाकडे देखील सोपविले असल्याची माहिती समोर आली आहे. यातच अजित पवार गटाकडून देखील अमोल कोल्हे आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
दरम्यान, शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीत देखील तोच पायंडा पुढे चालविला जात आहे. सुरूवातीला पक्षनाव आणि चिन्ह याबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटाची लढाई निवडणुक आयोगात झाली. त्यानंतर आमदार खासदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागण्या पुढे आल्यात. हे प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्याच प्रमाणे आता राष्ट्रवादीचं प्रकरण देखील त्याच वळणावर जात असल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण