मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराठीत झालेल्या लाठीचार्जबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर सादर केलं आहे. लाठीचार्जबाबत पोलिसांनी बचावात्मक पवित्रा हाती घेतला होता. दोषींवर कारवाई केली जाईल. गुन्हे मागे घेतले जणार नाही. असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावर २४ डिसेंबर नंतर देवेंद्र फडणवीस यांना पाश्चातापाची वेळ येणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत
माझा मराठा समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकार, लोकप्रतिनिधीवर बारकाईने लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रात मराठा समाज काय आहे ? हे दाखवून देऊ. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांततेतच होईल. पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
दरम्यान, आम्ही मागेही दुध का दूध, पाणी का पाणी करू, दोन तीन दिवस वाट पाहू. फडणवीस यांना मराठे पुन्हा एकदा उघडे पाडणार, ते खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार. त्यांनी आम्हाला समजून घ्यावे. फडणवीस यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत ? हे दाखवून देऊ, असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष