मुंबई : सत्ता येते जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शविला. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीच तापलं गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांना घेतलं जाऊ शकत नाही. मग प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, अजित पवार यांच्याबद्दल भाजपची भूमिका दुपट्टीपणाची का ? असा सवाल आता विरोधकांकडून केला जात आहे. यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंतांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून केला गेला आहे. अन् त्याच संबंधित त्यांची चौकशी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली.असा आरोप होतोय. ईडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपला चालते. पण नवाब मलिक चालत नाहीत. RKW डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपन्यांची ईडीद्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून २० कोटी रूपये देणगी घेतली तेही चालते. असा आरोप सचिन सावंतांनी केलाय.
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
आता भाजप नेते भाजपा अध्यक्षांना पक्ष कधी लिहिणार ? असा सवाल करत अजितदादांनी आपल्या सहकाऱ्याला भाजपजच्या दबावात वाऱ्यावर सोडणे योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का ? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी. उगीच उत्तर नाही म्हणून एक मिनिट एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये. असंही सचिन सावंतांनी म्हटलयं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी –
प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली – इडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत.
इतकेच काय? RKW डेव्हलपर्स लिमिटेड…— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक