पुणे : सत्ता येते जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शविला. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीच तापलं गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांना घेतलं जाऊ शकत नाही. मग प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, अजित पवार यांच्याबद्दल भाजपची भूमिका दुपट्टीपणाची का ? असा सवाल आता विरोधकांकडून केला जात आहे. याला आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून देखील विरोध दर्शविला जात आहे.
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील यावरून संताप व्यक्त केला आहे. भाजप प्रज्ञा साध्वी यांच्यावर आतंकवादाचा आरोप होऊनही त्यांना खासदारकी दिली. राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह आरोप झाले. परंतु गुन्हा सिद्ध झाला नाही. फक्त त्यांच्यावर आरोप आहेत. आपले राज्य कायद्यानुसार चालते व चालणार. असा इशारा देत आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे करणे अशोभनीय आहे. असं म्हणत रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे.
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
विधान परिषदेचे अजित पवार गटातील आमदार मिटकरी यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना मुळात हे प६ सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर जर अजित पवार यांना सांगितला असता तर नवाब मलिक हा विषय आलाच नसता. महायुतीत बिघाड होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. त्याबाबत चिंतन देखील करायला हवं. अशी प्रतिक्रियाही अमोल मिटकरी यांनी दिली.
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
भाजप प्रज्ञा साध्वी यांच्यावर आतंकवाद आरोप होऊन खासदारकी दिली,राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह आरोप झाले.
गुन्हे सिद्ध झाले नाहीत,आरोप आहेत.आपले राज्य कायद्यानुसार चालते व चालणार।
आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे करणे अशोभनीय आहे.@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/bHjyAW0CdJ— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?