जळगाव : आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपकडून सातत्याने ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. विविध मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. गुलाबराव पाटील जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत; आणि जे आमच्यामुळे मोठे झाले त्यांनी आमच्यावर टीका करू नये, तर मग कोणावर टीका करावी, असा टोला गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.
Read Also :
- …म्हणून पहिला मान धनंजयचा! सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार
- ‘संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, नामांतराचे राजकारण खेळू नये’, काँग्रेसने CMO ला ठणकावले
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस
- मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी ठाकरे सरकारकडून समिती गठीत