मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षरित्या ठणकावून सांगितले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर करत सीएमओच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले होते. विशेष म्हणजे ट्विटमध्ये काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या खात्याची माहिती होती. यावरून आता काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका पुन्हा एकदा थोरात यांनी मांडली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे आवाहन देखील त्यांनी केले.
Read Also :
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस
- मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी ठाकरे सरकारकडून समिती गठीत
- … आणि रोहित पवारांनी स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवली
- चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी