मुंबई : राज्य सरकारने एमपीएससी पाठोपाठ आता पोलीस भरतीतून देखील एसईबीसी आरक्षण वगळून भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात स्थगित आहे. या महिन्याच्या अखेरीस याबाबत नियमित सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पोलीस भरती रखडली होती. मात्र आता राज्य सरकारने एसईबीसी आरक्षण वगळून भरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये आक्रोश पाहण्यास मिळत आहे.
गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना उमेदवारांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल.
Read Also :
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस
- मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी ठाकरे सरकारकडून समिती गठीत
- … आणि रोहित पवारांनी स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवली
- चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी
- औरंगाबादचे नामांतरण म्हणजे शिवसेना-काँग्रेसचे नाटक, फडणवीसांचा घणाघात
- … आणि पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस