मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला होता. यामध्ये ममतांना पश्चिम बंगालची वाघीण समजणाऱ्या राऊतांना देखील चंद्रकांत पाटलांनी चांगलेच शाब्दिक टोले हाणले आहेत. ‘खासदार संजय राऊत एक नंबरचे डबलढोलकी नेते आहेत. मुंबईमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सुरात सुर मिसळतात.
एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
दिल्लीत गेले की काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या सुरात सुर मिसळतात. ते खुर्ची टिकविण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. आता ममतांच्या युपीएबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी डोळे वटारले असतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!
आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांना आपल्या भाषेत सुनावले आहे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य तुम्ही गांभीर्याने घेऊ नका, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटलांची विधानं ऐकून तुम्हाला त्रास होईल. त्यांना गांभीर्याने घेऊ नका. पाटील हे नैराश्यातून बोलत आहेत. पण आपण उत्तर दिलं तर विरोधी पक्षातील नेत्यांची प्रकृती खालावेल. त्यांनी आपली प्रकृती जपावी. महाराष्ट्रात इतकी वर्षे कुणी कुणाला खांद्यावर वाढवलंय हे सर्वांना माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
संजय राऊत हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता संजय राऊत हे आज प्रियांका गांधींची भेट घेणार आहेत. राहुल गांधी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची लवकर भेट घेण्याची शक्यता आहे, असे संकेत राऊत यांनी दिले. राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत हे आज प्रियांका गांधींना भेटणार असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण सुटले आहे.
Read Also :
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!
- नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!
- ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा?”