अमरावती : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या अथक परिश्रमामुळे भारताची चांद्रयान- ३ मोहिम काल यशस्वी झाली. या ऐतिहासिक क्षण संपुर्ण जगाने पाहिला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. यानंतर काल जगभरातून इस्त्रोवर अभिनंदानाचा वर्षाव सुरू झाला. यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी इस्त्रोचं कौतूक केलं. त्यानंतर त्यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांना लक्ष्य केलं.
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार
काल भारताची चांद्रयान -३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर अनेकांनी इस्त्रोला आणि भारताला शुभेच्छा दिल्यात. इस्त्रोचं कौतूक केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला. मनु आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला. लई वाईट वाटलं असलं बघा तुम्हास्मी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात. आता कसं असं म्हणत अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांना निशाण्यावर घेतलं.
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
दरम्यान, इस्त्रोचं कौतूक करतांना ते म्हणाले की, भारतीय शास्र्ज्ञांना मानाचा मुजरा. हे यश केवळ तुमचे आणि तुमचेच. कुठल्याही कर्मकांडाने व प्रार्थनाने हे यशस्वी झाले नाही. यामागे शास्रज्ञांनी अखंड मेहनत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. हा विक्रम ज्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाला त्या सर्व वैज्ञानिकांना सलाम असंही मिटकरी यांनी म्हटलंय.
“मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात… आता कसं 😄#जयहिंद pic.twitter.com/yVRzhVwV3F
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरण, शिंदे गटाच्या आमदारांंचं ६ हजार पानी लेखी उत्तर, उत्तारात दडलंय काय ?
हेही वाचा…भुजबळ झाले, मुंडे झाले, आता मुश्रीफ, शरद पवारांचा हुंकार कोल्हापुरात गुंजणार
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”