मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आता शिंदे गटातील १६ आमदारांनी सहा हजार पानांचं लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केले आहे. तर ठाकरे गटाच्या आमदारांकडून अद्याप लेखी उत्तर सादर केलं नाही.
हेही वाचा…शरद पवारांसह ठाकरे, अशोक चव्हाणांची मुंबईत बैठक, इंडिया मुंबईत जोरदार बॅंटिंग करणार
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासाठी ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली होती. यासाठी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती.
हेही वाचा…“आता पापी गद्दारांना राजकारणातून संपवायचं,” उद्धव ठाकरे गडाडले, नगरचा माजी खासदार ठाकरे गटात
दरम्यान, मागील काही वर्षापासून शिवसेना पक्ष फुटीचं प्रकरण चर्चेत आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाबाबत कधी निर्णय देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळ झाले, मुंडे झाले, आता मुश्रीफ, शरद पवारांचा हुंकार कोल्हापुरात गुंजणार
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
हेही वाचा…भारताची चांद्रयान- ३ मोहिम फत्ते, मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील नेत्यांनी मानले इस्रोचे आभार