मुंबई : राज्यात सध्या आमदार अपात्रतेच्या निकालावरून राजकीय वातावरण तापलेलं असून काॅंग्रेसने निवडणुकांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टवार यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यासह काॅंग्रेसचे राज्यातील सर्व नेते उपस्थित होते.
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार आहे. बूथ कमिटी वर कार्यकर्त्यांनी नियोजन करून काम केले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून काॅंग्रेस पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील. यासाठी पक्षाने मजबूत बांधणी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अधिक जागा निवडून आणण्यासाठी पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारून जबाबदारीने काम करायला माझ्यासह पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते तयार आहेत.
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, यातच कुणाला जास्त, कुमाला कमी असा महायुतीसारखा गोंधळ आमच्यात नाही. आमच्या सर्व्हेत जवळपास ४६ जागा या महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्या सर्व जागांवर आमचेच उमेदवार जिंकून येतील. असा दावा नाना पटोले यांनी केलाय. तसेच भाजपा निवडणुकीला घाबरत आहे. महाविकास आघाडीत सर्व काही सामंजस्याने होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…