मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी जो निकाल दिला. त्याला त्यांनी शिवसेनेची १९९९ सालची घटना आधार मानली होती. मात्र ठाकरे गटाकडून २०१८ सालची घटना ग्राह्य धरण्याची विनंती केली गेली. मात्र राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे असलेलीय घटना ग्राह्य धरली. यावर भाष्य करताना राज्याचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे यांनी २०१८ ची घटना आधार माना, असे सांगून चालणार नाही. त्यांनी ती घटना निवडणूक आयोगाकडे जाऊन नोंदणी करायला हवी होती. हे त्यांचे चुकलेच. त्यामुळे आता ते कितीही सांगत असले की घटना बदलली तरी ते मानता येणार नाही. त्यामुळे शिवसेना अपात्रेबाबत अध्यक्षांनी दिलेला निकाल हा त्यांना घालून दिलेल्या चौकटीतच आहे. याउलट जर त्यांना अधिक पुरावे तपासण्याचा अवधी मिळाला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. असेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यावर बोलतांनी अणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं तरी शेवटचा निकाल हा जनतेचाच असेल. मात्र पक्षाच्या घटनेची वैधता, व्हीप या बाबींच्या बाबतीत त्यांचा कायदेशीर लढा हा सुरूच राहील. तुर्तास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे व्हीप हे वेगळे राहतील ते दोन्ही गटांकरता बंधनकारक होऊ शकणार नाहीत. आणि भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल. कारण सध्याच्या काळातील लोकशाहीत घराणेशाहीला स्थान नाही हे या उदाहरणांवरून सिद्ध होतंय. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपपाल्या घटनांची योग्य पद्धतीने रचना करून ती अधिकृत करून घेणं आवश्यक असल्याचंही ते त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला ६ जानेवारीला याप्रकरणासंदर्भात कागदपत्रे सोपवली गेली आहेत. तर ८ जानेवारील याचिकेसाठी अधिकची, तसेच अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ दिला होता. यातच आज याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी करण्यात आली. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर केलेली कागदपत्रे तपासली गेली आहेत.
तर उद्या याचिकेशी संबंधित अजित पवार गटातील कागदपत्रांची पाहणी केली जाणार आहे. यातच १४ जानेवारील सुनावणीच्या वेळी कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल. तसेच यावेळई सुनावणीचे विषय नक्की केले जातील. १८ जानेवारीला प्रतिज्ञापत्र तर २० जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी केली जाणार आहे. तर २३ जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी केली जाईल. २५ आणि २७ जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद होणार असून ३० जानेवारीला अंतिम निकाल लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली