ठाणे : पुढील लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून शिंदेंना मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे गटातील विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या विरोधात शिंदेंना तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. यातच आता शिंदे गटाकडून विधान परिषदेचे माजी आमदार रविंद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये ठाणे लोकसभेची लढाई होणार आहे. राजन विचारे आणि रविंद्र फाटक हे दोघेही आनंद दिघे यांच्या विचारांवर आतापर्यंत पुढे आले आहेत. त्यामुळे ठाण्याची लढाई आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची करून ठेवली आहे.
हेही वाचा…शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली
ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीने रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्बेत केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी रविंद्र फाटक यांनी रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि ठाणे लोकसभेसाठी फिल्डिंग लावली होती. मात्र फाटक यांना आता ठाणे लोकसभा दिल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच आता ठाण्यात ठाकरेंचा राजन विचारे आणि फाटक यांच्या लढत आता अटळ झाली आहे.
हेही वाचा…अक्षय कुमार अन् विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला
ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत असून कागदावर महायुतीची ताकद अधिक दिसून दिसत आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आहेत. तर कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघात स्वत: एकनाथ शिंदे नेतृत्व करीत आहेत. ओवला माजिवडा मतदारसंघातून शिंदेंचे प्रताप सरनाईक, तर ऐरोली आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे, गणेश नाईक, आणि मंदा म्हात्रे म्हणून भाजपच्या खासदार आहेत. यातच मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात अपत्र गीता जैन आमदार असून त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांना निवडून येण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने ही लढाई आता प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कोण विजयी होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?