मुंबई : ‘दिल्लीमध्ये भाजपचे लोक भेटले होते, त्यांनी सुद्धा मला सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या लोकांना ते टार्गेट करत आहे. त्यांना टाईट केले जात आहे. एकतर आम्ही काही आमदार फोडून सरकार पाडू किंवा राष्ट्रपती राजवट लागू करू, असा इशारा दिला होता, असा खळबळजनक खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंगचं पाहू; राऊतांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर राऊतांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
शाखो से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम… संजय राऊतांच्या ट्विट ने राजकीय गोटात खळबळ
“२० दिवसांपूर्वी भाजपचे काही लोकं मला भेटले. त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला इथे सरकार पाडायचंय. आम्हाला इथे राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे. तुम्ही मध्ये पडू नका. मी म्हटलं 170 आमदारांचं सरकार कसं पाडू शकता. तर ते म्हणाले, तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. त्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाही म्हणून. पण ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही. त्यांनी पवार कुटुंबावर धाडी पाडत असल्याचे बोलले. आम्ही त्यांना सुद्धा टाईट करु, असंही ते बोलले. विशेष म्हणजे त्यानंतर पवार कुटुंबाच्या घरावर धाडी पडल्या. तिथे सुद्धा याच प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. आम्ही प्रतिकार करु. सरकार पाण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पाडू. तर ते म्हणाले, आम्ही केंद्रीय पोलीस यंत्रणा आणून थंड करु. तिसऱ्या दिवशी माझ्यावर ईडीचा छापा पडला. अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे चार वाजता धाड पडली. विशेष म्हणजे मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना अटक होईल, असं म्हणतो, असं राऊत म्हणाले.
मी फरार नाही, दिल्लीत आहे, पोलिस बोलावतील तेव्हा यायला तयार; आमदार रवी राणांचे स्पष्टीकरण
‘महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहे, दबाव टाकला जात आहे, शरण येण्यास सांगितले जात आहे. तुम्ही जर शरण या नाहीतर सरकार आम्ही पाडू अशी धमकी देत आहे. दिल्लीमध्ये भाजपचे लोक भेटले होते, त्यांनी सुद्धा मला सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या लोकांना ते टार्गेट करत आहे. त्यांना टाईट केले जात आहे. एकतर आम्ही काही आमदार फोडून सरकार पाडू किंवा राष्ट्रपती राजवट लागू करू, असा सल्लाही त्यांनी दिला.
गोव्यात पहिल्यांदाच मतदानाचा विश्वविक्रम; भाजप उमेदवार जोशुओ डिसोझांनी मानले मतदारांचे आभार
ईडीच्या लोकांच्या पवार यांच्या कुटुंबीयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. पाच पाच दिवस ईडीचे लोकं घरी बसून होते, नातेवाईकांवर हाच दबाव टाकण्यात आला होता. पवारांनी मी बोललो आणि सामोरं जाण्याचं ठरवलं. मी समोर जाण्यास तयारी दाखवली, त्यानंतर माझ्यावर आणि कुटुंबावर ईडीने दबाव टाकण्याचे काम सुरू केले. माझे मित्र आणि मुलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पहाटे तीन, चार वाजेच्या सुमारास फोन करून मला अटक करून नेतील अशी मुलांना धमकी दिली जात आहे, असंही राऊत म्हणाले.
Read also:
- मोठी राजकीय उलथापालथ: राऊतांच्या पत्रकार परिषदेआधीच चंद्रकांत पाटील, सोमय्या दिल्लीकडे रवाना
- कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सात दिवसात FIR दाखल करा, अन्यथा पोलिसांना कोर्टात खेचू – सोमय्या
- मोठी बातमी: चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, ‘या’ तारखेला सुनावणार शिक्षा
- नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसच आंदोलन; काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
- “सो सोनार की एक लोहार की” संजय राऊतांनी दिले ‘राजकीय’ युद्धाचे संकेत