मुंबई : अतिवृष्टीमुळे रखडून गेलेली शेती, त्यात घेतलेले पीक हे निकामी होत असल्याचे पाहून पुढे जगावं कसं ? या काळजीपोटी विदर्भात गेल्या ९ महिन्यांमध्ये १ हजार ५८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या २५ वर्षातील ही विक्रमी संख्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील २ दोन दिवसांत ६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. यातच महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांच्या गाई जनावरांना खायला चारा उपलब्ध नाही.
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी; त्यांना दिलासा द्यावा तसेच दुष्काळी परिस्थिती असलेल्या ठिकाणी लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा. राज्यात यंदा कमी पाऊस झाल्याने काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती लागवडीचा खर्चदेखील वाढला आहे. बँकांनी अपुरे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
दरम्यान, महाराष्ट्रात भयंकर असा दुष्काळ पडला असून शेतकऱ्याच्या गाई जनावरांना खायला चारा नाही जिथे उपलब्ध आहेत ते 80 हजार रुपये एकराने मका किंवा इतर चारा मिळत आहे त्याची तोडणी आणि त्याची कटिंग केले असता 1 लाख रुपये एकर याप्रमाणे खर्च होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याचे सोडून हे सरकार शेतकऱ्याला गाडण्याचा प्रयत्न करत आहे 34 रुपये लिटर प्रमाणे भाव फिक्स केले असून त्याचा कोणताही जीआर न काढल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व डेअरी उत्पादन करणारे फॅक्टरी मालक व सरकारी संघानी 30 ते 32 रुपये प्रति लिटर भाव प्रमाणे भाव देत आहे मार्केटमध्ये मिळणारे जनावरांना खाद्य त्याचे प्रति दोन रुपये किलो प्रमाणे भाव वाढले असून शेतकरी मेटीकोटीस आलेला आहे आज 1,50 लाख रुपयाच्या गायची किंमत दुष्काळामुळे चाळीस ते पन्नास हजारावर आली आहे लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या गाई भे भावात विकल्या जात आहे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का हा प्रश्न पडला आहे. असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात भयंकर असा दुष्काळ पडला असून शेतकऱ्याच्या गाई जनावरांना खायला चारा नाही जिथे उपलब्ध आहेत ते 80 हजार रुपये एकराने मका किंवा इतर चारा मिळत आहे त्याची तोडणी आणि त्याची कटिंग केले असता 1 लाख रुपये एकर याप्रमाणे खर्च होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याचे सोडून हे…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”