मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रातील भाजप सरकार ओबीसी महिलांना आरक्षण का देत नाही ? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
ओबीसींची जेवढी लोकसंख्या, तेवढा वाटा हा आपल्या ओबीसी बांधवांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा. ओबीसींचे जे हक्क केंद्रातील भाजप सरकारने रोखून ठेवले आहे ते सर्व काॅंग्रेसचे सरकार आल्यावर ओबीसींना देण्यात येईल हा शब्द राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. तसेच महिला आरक्षणाची अंमलबजावणी १० वर्षानंतर नाही तर आताच करावी ही मागी सुद्धा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
दरम्यान, केंद्र सरकारने काल संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक सादर केले अन् ते प्रंचड बहुमताने मंजूर झाले. त्याबाबत बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, या विधेयकात ओबीसींना आरक्षण नाही, त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षण मिळणार नाही. केंद्रातील भाजप सरकार ओबीसी महिलांना आरक्षण का देत नाही? भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे हा सवाल देखील त्यांनी केला आहे. याचसोबत लवकरात लवकर ओबीसी जनगणना करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू