मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांच्या दिरंगाई कामकाजावरून सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर काल तातडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनिती ठरवल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. यातच आता पुढची सुनावणी २५ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दट्ट्या मारला, तेव्हा सुनावणी सुरू होते. अजून सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीसा निघाल्या. थातूर-मातूर कारणं देऊन वेळ मारून नेली. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. आठवड्याच्या आत सुनावणी घेऊन यासंदर्भातलं वेळापत्रक द्यायचं आहे. त्यामुळे आता कुणाचीही सुटका नाही. यांना निर्णय घ्यावाच लागेल. असं अनिल परबांनी म्हटलं.
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, विधानसभेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल लागून ते अपात्र होतीलच. पण आमच्या म्हणण्याप्रमाणे वरच्या सभागृहातले तीन आमदारही अपात्र होणार आहेत. असंही अनिल परब यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे, विप्लब बजोरीया आणि निलम गोऱ्हे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटातील आमदारांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला