मुंबई : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हा वाद आता दिल्लीपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसात काॅंग्रेसची कार्यकारीणी बैठक होत असून या प्रकरणावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यातच बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्यावरून सामानातून नाना पटोले यांच्यावर ताशोरे ओढले आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी नाना पटोलेंच जबाबदार असल्याचं सामानातून म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते देखील नाना पटोलेंवर नाराज असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहेत.
हेही वाचा..“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशानंतर काॅंग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये आज जे घडतंय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गजरेचे आहे. पटोले-थोरात वाद चिघळू नये, टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. असं सामानातून म्हटलं आहे.
हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा. पटोले यांची राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकाटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. अशी प्रखर टिका नाना पटोले यांच्यावर कऱण्यात आली आहे.
हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
तसेच पुढे असं म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक राज्यापालांनी होऊच दिली नाही. व त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीस मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल. अशी टिकाही सामानातून करण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा..“महाविकास आघाडीची एक बंडाळी टळली, बाळासाहेबांनी कसब्यातून घेतली माघार
- हेही वाचा..“कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला, मुनगंटीवार, पाटील, मिसाळ भाजपची फौज मैदानात
- हेही वाचा..‘राहुल कलाट्यांना शिवसेनेकडून अजूनही अपेक्षा, सादर केले दोन अर्ज, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष्य
- हेही वाचा..मोठी बातमी..! राजीव सातवर यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला
- हेही वाचा..“ठरलं तर.. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध, आता कसून प्रचार करा