मुंबई : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हा वाद आता दिल्लीपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसात काॅंग्रेसची कार्यकारीणी बैठक होत असून या प्रकरणावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यातच बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेता पदाचा राजीनामा दिल्यावरून सामानातून नाना पटोले यांच्यावर ताशोरे ओढले आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी नाना पटोलेंच जबाबदार असल्याचं सामानातून म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते देखील नाना पटोलेंवर नाराज असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहेत.
हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा. पटोले यांची राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकाटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. अशी प्रखर टिका नाना पटोले यांच्यावर कऱण्यात आली आहे.
हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
तसेच पुढे असं म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक राज्यापालांनी होऊच दिली नाही. व त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीस मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल. अशी टिकाही सामानातून करण्यात आली आहे.
हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”
दरम्यान, अपक्ष आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून सध्या काॅंग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. नाशिकच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना उगाचच गोवण्याचा प्रयत्न केल्याने बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सर्व आरोप काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केलेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या काॅंग्रेस नेत्यांच्या गोटात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत.
Read also
- हेही वाचा..“मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही, शिंदे-फडणवीस हे जनाधार नसणारं सरकार”
- हेही वाचा..‘कसब्यातील उमेदवारीवरून ब्राम्हण समाज नाराज असल्याच्या बातम्यावर ‘ती’ पोस्ट व्हायरल
- हेही वाचा..आमदाराकीची शपथ घेतल्यानंतर तांबे लागले कामाला, केसरकरांची भेट, त्यानंतर थेट आझाद मैदानावर
- हेही वाचा..“एका बाजूला मोदींच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला अडाणींच्या घोषणा,” सभागृहात मोठा गदारोळ”
- हेही वाचा..“आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”