मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान देत आहेत. यातच शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला जात आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून बाळासाहेब ठाकरे यांचे निहार ठाकरे यांच्या नावाची चाचपाणी सध्या सुरू करण्यात आली आहे. यावर प्रश्न विचारताच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यावर ठाकरे गटातील आमदार सुनील शिंदे यांनी त्यावर जोरदार निशाणा साधलाय.
हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
वरळी विधानसभा मतदार संघातून सध्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निहार ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर त्यांच्याविरोधात फक्त सचिन अहिर, सुनील शिंदेंच का ? कुणीही होऊ शकते. काहीही होऊ शकते. सचिन अहिरची ताकद आहे. सुनील शिंदेंची ताकद आहे. ते निवडणुक लढवू शकतात. ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतचं करू. अजून एक वर्ष शिल्लक राहिलं आहे. बघा काय होते ते. असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
त्यावर आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याच सोबत राहणार असल्याचं सुनील शिंदे यांनी शिरसाठ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी वरळीची शिवसेना अभेद्य आहे, आणि वरळी हा शिवसेनेचा गड आहे, त्याला कोणी सुरूंग लावायचा प्रयत्न करू नये. अन्यथा वरळीची जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
दरम्यान, संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. वरळी हा त्यांचा मतदारसंघ नाही. सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या छाताडावर पाय ठेऊन ते पहिली पायरी चढलेत हे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानाला महत्त्व देण्याचं कारण नाही. राजकारणात एक निवडणुक जिंकली म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असे त्यांना वाटते. आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या तरी आमच्यात हा अंहकार आला नाही. असंही संजय शिरसाठ यांनी सांगितले.
आम्ही शेवटपर्यंत मा. उद्धवसाहेबांसोबतच !
कोणी कितीही प्रयत्न केले तरी वरळीची शिवसेना अभेद्य आहे आणि वरळी हा शिवसेनेचा गड आहे, त्याला कोणी सुरुंग लावायचा प्रयत्न करू नये, अन्यथा वरळीची जनता सुज्ञ आहे, त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही !@ShivSena @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/PEOTh4NUlG— Sunil Shinde (@misunilshinde) February 7, 2023
Read also
- हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज
- हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
- हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
- हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
- हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
- हे सर्व वाद तात्पुरते असतात, नंतर सगळं ठीक होईल, पटोले थोरातांच्या वादावर सुशील कुमार शिंदेंचा विश्वास