नाशिक : हिमंत असेल मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा देऊन वरळी माझ्याविरोधात निवडणुक लढवून दाखवावी, असं आव्हान शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्यानंतर बंडखोर आमदारांच्या गटातील नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. त्यानंतर सबको हिला दिया, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टिकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
माझ्या वक्तव्यावरून बरीच चर्चा झाली. समाज माध्यामावर देखील हाच विषय होता. एक त्यात म्हणजे सबको हिला दिया. असं म्हणत एवढ्या सर्व लोकांना पुढे करण्याऐवजी त्यांनी स्वत:च सांगितले असते की लढायची हिमंत नाही. तरी चालले असते. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले की, 40 लोकांनी कुठुनही राजीनामा देऊ द्या किंवा महाराष्ट्रात पुन्हा निवडणुक घ्या, आम्ही तयार आहोत. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
“नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरेंवर टिका करण्यात आली. बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील शीतल म्हात्रे, संजय गायकवाड, यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेतील राजकीय वातावरण चांगलचं चर्चेच आलं आहे. आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र भर शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
Read also
- “पोटनिवडणुक बिनविरोध करा, आम्ही उमेदवारी टिळकांना देऊ..;” कसब्यातील पोटनिवडणुक चर्चेत
- “बापटांना घाम फोडणारा नेता आघाडीकडून कसब्याच्या पोटनिवडणुकीत उभा,” हेमंत रासनेंची डोकेदुखी वाढणार ?
- “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा”, आव्हांडाचा भाजपला सवाल, आभारही मानले
- निवडणुकीसाठी अश्विनी जगतापांचा प्रसार करण्यास सुरूवात, RSS चा जगतापांना पाठिंबा
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा