मुंबई : निवडणुक आयोगाकडे निवडणुका घेण्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच शिवसेनाप्रमुख पद तसचं ठेऊन पक्षप्रमुख पद स्विकारले आहे. मात्र शिवसेनेतून निघून गेलेल्या गद्दारांना शिवसेनेची घटना मान्य नाही. यातच आम्ही लाखांच्या घरात प्रतिज्ञापत्र दिली असून गद्दारांचा शिवसेनेवरील दावा हास्यास्पद असल्याचं सांगत शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा.. ठाकरेंनी सांगितलंय, पाठिंबा आपल्यालाच, त्यामुळे कलाट्यांना सांगण्याचं काम आम्ही करू, बाकी मग.. अजित पवार
मागच्या जुलै महिन्यात पक्षादेश मोडून बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षावर दावा केला. परंतु घटनातज्ज्ञांनी देखील आमच्याच बाजूने मत दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाबाबत निकाल लागेपर्यंत निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेनेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे. तसेच त्याआधी सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागावा. अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा..“भकास झालेल्या कसब्याला सजवायला येतोय,” अभिजीत बिचुकलेंनी दाखल केला कसब्यातून अर्ज
लोकशाहीच्या दृष्टीने अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. विधीमंडळ पक्ष म्हणजेच संपुर्ण पक्ष होत नाही. यामुळे पैशांचा जोरावर उद्या कुणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल अशी अपेक्षा आहे. अपात्रतेच्या मुद्दा अगोदर निकाली निघायला हवा. आमचा लोकशाही, न्यायालयावर संपुर्ण विश्वास आहे. त्यात आमची बाजू अधिक भक्कम असून धनुष्यबाण का गोठावला. गद्दारांनी अद्याप कुठलीच निवडणुक लढवलेली नाही. मग निवडणुक आयोगाने इतकी घाई का केली. ? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केलेत.
हेही वाचा..“थोरातांचा राजीनामा अजित पवारांना माहिती, पण पटोलेंना नाही, आघाडीत नेमकं काय चाललंय?”
“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता असून निवडणुक आयोगाने काय करावे असे आम्हाला सांगायचे नाही. ही माहिती जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हावा या हेतूने दिलेली आहे. संख्या, प्रतिज्ञापत्र आम्ही दिलेले आहे. एकतर्फी निकाल द्यायचा असता तर निवडणुक आयोगाने अगोदरच निकाल दिला असता. आम्ही न्यायालयाला विनंती केली होती, परंतु न्यायालयाने निवडणुक आयोग स्वतंत्र संस्था असल्याचे सांगत निवडणुक आयोगाने निकाल दिल्यास त्याला आव्हान देता येईल. अनिल देसाईंना आम्ही निवडणुक आयुक्तच म्हणतो. अनिल देसाई याबाबत सगळी प्रक्रिया बघताहेत”. असंही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये उंचीपेक्षा मोेठे स्थान देऊ, थोरातांना भाजपची ऑफर
शिवसेनेची घटना अयोग्य आहे हा दावाच चुकीचा आहे. पक्षाची निवडणुक होण्यागोदर निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त होतात. पदांसाठी उमेदवारीचे अर्ज मागवला जातात. एकच अर्ज आल्यावर तसे निवडणुक आयोगाला कळवल्या जातात. त्यानंतर प्रस्ताव, अनुमोदक सर्व कायदेशीर, लोकशाही प्रक्रिया पार पाडून पक्षांतर्गत निवडणुक घेतल्या जाते. निवडणुक आयोगाला ह्या सर्व प्रक्रियेची माहिती आणि त्यावर निवडणुक आयोगाने त्यावर आजवर शिक्कामोर्तब वेळोवेळी केले आहे. निवडणुक आयोगात आजवरची सगळी माहिती आहे. असं अनिल देसाई यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”
- हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज
- हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
- हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
- हेही वाचा..‘माफी मागतो, पण एवढे मोठे कारण नाही’; डीजेवरून राडा प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!