मुंबई : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, कोल्हापुरात त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत काँग्रेस कमिटी कार्यालय येथे आणण्यात येणार आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी आमदार जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशी भावनकि पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
काँग्रेसला डिवचून ममता बॅनर्जी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भेट घेतायेत का?
दरम्यान, कोल्हापुरात आज दुपारी १.०० ते १.३० पर्यंत काँग्रेस कमिटीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सम्राटनगर येथील घरी पार्थिव नेण्यात येणार आहे. दुपारीपर्यंत त्यांचे पार्थिव सम्राटनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता घरातून अंत्ययात्रा सुरू होईल. आमदार जाधव यांच्या निधनाची बातमी एकूण धक्का बसला आहे. साधे आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. एका उमद्या सहकाऱ्याचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 2, 2021
आमदार जाधव काही महिन्यापूर्वी मुंबईत छोटी शस्त्रक्रिया ही झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी आठवड्याभरापूर्वी त्यांना हैदराबादमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र पुन्हा इन्फेक्शन झाल्याने दोन दिवसापूर्वी आणखी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
Read Also :
- “काँग्रेस कधी उटांसारखी तिरकी चालत नाही”; ममतांच्या दौऱ्यावरून अशोक चव्हाणांनी झापले
- मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, परमबीर यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा..
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्याला रोखण्यासाठी राजू शेट्टी मैदानात!
- वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही – बाळासाहेब थोरात
- मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल