बीड : मराठा आरक्षणावरून आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन हजार जणांची चौकशी केल्याचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माहिती दिली आहे. हॉटेल आणि इतर मालमत्ता जाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…““दिवाळीनंतर संपुर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार,” भुजबळांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या आंदोलकांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांचा बंगला आणि गाड्या जाळण्यात आल्या. तर बीडमध्ये हॉटेलही जाळण्यात आले. यामुळे बीडमध्ये मोठा हिंसाचार दिसून आला. यामुळे पोलिसांनी संचारबंदीचे आदेश दिले होते. तर अनेक जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
हेही वाचा…“भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करू नये”, महायुतीच्याच मंत्र्यांनी भुजबळांना दिला इशारा
दरम्यान, बीडच्या घटनेवरून आता राजकीय रणकंदनही माजले आहेत. कालच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जाळपोळ झालेल्या घटनांची पाहणी करत तेथील नेत्यांशी चर्चा केली. यावरून भुजबळांनी सरकार तसेच मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्ला चढवला. तर विनाकारण मराठ्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल करून दवाब आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी लावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या