कोल्हापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांवर भाजपने आरोप केलेल्या कंपनीला पुन्हा आता महायुती सरकारने कंत्राट दिल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी लोक लोकांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी लावला आहे.
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लॉंडरिंग झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता.
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
त्यासाठी भाजपने पत्रकार परिषदा आणि कोल्हापुर दौरा या माध्यमातून रान उठवलं होतं. आता याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का ? असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय.
ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लाँडरींग झाल्याचा गंभीर आरोप #मविआ सरकारच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी… pic.twitter.com/qASCWkPLaF
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…““दिवाळीनंतर संपुर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार,” भुजबळांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
हेही वाचा…“भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करू नये”, महायुतीच्याच मंत्र्यांनी भुजबळांना दिला इशारा
हेही वाचा…“पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट, जिल्ह्यात युतीची ताकद वाढली”
हेही वाचा…“जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, तवा..,”ठाकरेंवर टिका, सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर