पुणे : राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मोठी बाजी मारली आहे. राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झालं होतं. त्यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये महायुतीला 1328 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला तर महाविकास आघाडीला फक्त 526 ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत. यातच पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट असल्याचं दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आवाहन दिलंय.
हेही वाचा…“जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, तवा..,”ठाकरेंवर टिका, सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. सत्तेतील एक पक्ष आणि दोन गट यांनी जनतेचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आता हीच वेळ आहे. मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. असं आवाहन प्रशांत जगताप यांनी दिलंय.
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला २२८ पैकी १५३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपसोबत अजित पवार गट गेल्यामुळे पुणे जिल्ह्यात युतीची ताकद वाढली आहे. या निकालाचे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. सत्तेतील एक पक्ष आणि दोन गट यांनी जनतेचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला. हीच वेळ आहे मग.. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) November 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
हेही वाचा…““दिवाळीनंतर संपुर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार,” भुजबळांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
हेही वाचा…“भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करू नये”, महायुतीच्याच मंत्र्यांनी भुजबळांना दिला इशारा
हेही वाचा…“पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट, जिल्ह्यात युतीची ताकद वाढली”