मुंबई : देशातील सर्वात मोठा वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यामातून महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणावरून भाजप आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहे.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
वेदांता कंपनीचा हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत 107 इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून 70 हजार ते 1 लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत अशी आमची इच्छा आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत: साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार आहे. बाजीगर चित्रपटात एक डॉयलॉग आहे, हार के जीतने वाले को बाजीकर कहते है. पण या गुंतवणुकीच्या बाबतीत जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते है. असं लागू होतं. असं आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
दरम्यान, सुभाष देसाई आणि माज्या वेदांता कंपनीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. 21 जानेवारी 2022 रोजी आमची वेदांत आणि फॉक्सकॉनच्या उद्योगाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जागा निश्चितीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी पाहणी कऱण्यात आली शेवटी पुण्याजवळील तळेगाव येथील जागा निश्चित केली. हा उद्यागो गुजरातमध्ये जाण्याबाबात किंवा कुठेही इतरत्र जाण्याबाबत दुख नाही पण ही कंपनी महाराष्ट्रात येणार हे 95 टक्के ठरलं असताना शेवटच्या क्षणी ही गुंतवणुक दुसरीकडे का गेली ?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Read also
- “पुण्यात तरूणीचा अश्लिल डॉन्स व्हिडीओ व्हायरल; रूपाली पाटलांनी बोलवून घेत दिली तंबी”
- “देशातील सर्वात मोठा प्रकल्प ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला”
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”