मुंबई : आगामी काळात राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविदं केजरीवाल यांच्या पक्षाने मुंबई महापालिकेच्या सर्वाच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळणार आहे.
हिंदू सणांच्याबाबतच ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आशिष शेलारांचा संतप्त सवाल
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी अद्यापही निवडणुक जाहीर करण्यात आलेली नाही. अशावेळी आम आदमी पक्षाने उमेदवार निवडीला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावरून प्रचार देखील सुरू केला आहे. दिल्लीच्या विकासाचा मुद्य़ा घेऊन आप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणारत उतरणार आहे. त्यामुळे मतदानाचा परिणाम राज्यातील राजकीय पक्षांना होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगल्या आहेत.
पवार साहेबांनी काय केलं? यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? अमोल मिटकरींचा सवाल
मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे 236 जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती आपचे मुंबई सचिव संदीप मेहता यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. तर दिल्ली बदली अब मुंबई की बारी असा नारा देखील आपने दिला आहे.
खोटं बोलणारी गुडीया म्हणजे नाना पटोले; आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर
दरम्यान, सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारचं सरकार आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रस आणि शिवसेना आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र अशी चर्चा सुरू आहे. अशातच आता मुंबईची काॅंग्रेसची सुत्रे भाई जगताप यांनी हातात घेतल्यानंतर त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र निवडणुक लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा
- आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
- मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
- आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल