मुंबई – मागच्या काही दिवसांपासून राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेले राणा दाम्पत्याने नवी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार, मुंबई महापालिकेचा कारभार यावर कडाडून टीका केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचावर देखील त्यांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यासिनच्या या आरोपांनांतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे. “सी ग्रेड कपल” असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली.
उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा..; अयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण यांचा राज ठाकरेंना कडव आव्हान
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या,” नवनीत राणा आणि रवी राणा यांना ‘सी ग्रेड’ लेव्हलची पब्लिसिटी लागते. आणि या पब्लिसिटीच्या वेडामध्ये हे दोघे काहीही बरळत आहेत. संविधानिक पद आहेत त्या पदांवर डायरेक्ट हल्लाबोल हे दाम्पत्य करत आहे. त्यामुळे मी अशा लोकांचा निषेध करते. या लोकांवर आता पोलीस आणि नयायलायने प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे.त्यांना कोर्टाने अति आणि शर्ती घालून जामिनावर मुक्त केले आहे. मात्र ते कोर्टाचा आणि संविधानाचा भंग करत आहेत. त्यामुळे अशा ‘सी ग्रेड’ पब्लिसिटी करणाऱ्या कपलवर न्यायालायने आणि पोलिसांनी दखल घ्यावी. जरी ते आमदार किंवा खासदार असले तरी पोलिसांनी त्यांचा वागण्याची दखल घ्यावी” अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
“राज्यात दंगली घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर एकीकडे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत. “इंग्रजांनी लावलेली कलमे अनेक महान व्यक्तींवर लावण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्याने आमच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी इंग्रज काळापासूनच्या कायद्यावर मोठा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली, राज्यावरील अरिष्ट, साडेसाती टळण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार होतो. पण आम्हाला १४ दिवस तुरुंगात डांबले, राजद्रोहाचे कलम लावले.देशाचे पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि कायदा मंत्री किरण रिजीजू हे असे जुनाट कायदे मोडून काढत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. तरीही मुख्यमंत्री मात्र इंग्रजांच्या कायद्यांचा वापर करून आम्हाला तुरुंगात डांबत आहेत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला, याबद्दल आम्ही कोर्टाचे आभार मानतो.” असे रवी राणा पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
Read also:
- मस्तवाल झालेल्या या सरकारने राज्यात अक्षरश: हैदोस घातलाय; दरेकरांची राज्य सरकारवर खरमरीत टिका
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ
- राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
- राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
- “राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया