पुणे : शरद पवारांसोबत झालेली ही भेट अचानक नसून पुर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेंच्या काही अडीअडणींच्या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांकडून काही मार्गदर्शन आणि काही सूचना पाहिजे होत्या. त्यामुळे त्यांची भेट घेतली होती. चार पाच दिवसापुर्वीच ही भेट ठरली होती. यावेळी रयत शिक्षण संस्थेंचे काही पदाधिकारी देखील सोबत होते. आज सकाळीच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर आता दिलीप वळसे पाटलांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही? पोलिस महासंचालकांनी दिली मोठी माहिती
शरद पवारांची भेट घेतल्यामुळे कोणताही संभ्रम होण्याचं कारण नाही. कारण शरद पवारसाहेब हे विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी भेट घेतल असल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द शरद पवार यांचा की अजित पवार यांचा असा सवाल करण्यात आला. तेव्हा त्यांनी अंतिम शब्द हा शरद पवार यांचाच असल्याचे वळसे पाटलांनी सांगितले.
हेही वाचा…“तर अजित पवारांवर तात्कळ गुन्हा दाखल करा,” आयोगाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाची मोठी मागणी
पक्ष फुटीनंतर रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या रचनेत कोणताही बदल होणार नाही. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम होण्याचा प्रश्न नाही. कारण अशा अनेक संस्थांमधून सध्या काम पाहत असतांना शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. त्याच संस्थांच्या प्रश्नांच्याबाबत त्यांच्या कानावर घातले आहेत.
राजकीय गोष्टी या वेगळ्या असून संस्थात्मक राजकारणामध्ये शरद पवार अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचाच मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. ३१ ग्रामपंचायतीपैकी २४ ग्रामपंचायतींवर आमच्या विचारांचे सरपंच झाले आहेत. आमच्याच ग्रामपंचायतीमध्ये काही बदल झाले आहेत. त्यांची काही कारणं असतील. आता गावात गेल्यावर त्याची माहिती घेणार असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यातच अलिकडेच आमची सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत कुणीही टोकाची भूमिका मांडू नये, असं ठरलं. यातच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्यात यावा, अशी सर्वांची भूमिका राहिली आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आत्ताही शरद पवारांचंच मार्गदर्शन,” शरद पवारांच्या भेटीवर ‘दिलीप वळसे पाटलां’चं मोठं विधान
हेही वाचा…उद्धव ठाकरे अडचणीत ? सुप्रिम कोर्टात ‘या’ प्रकरणाबाबत ठाकरेंच्याविरोधात अवमान याचिका दाखल
हेही वाचा…अजित पवार गटातील अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता पोहचला शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंनी दिवाळीत केला डबल धमाका,” राज्य सरकारवर साधला निशाणा
हेही वाचा…“अधर्माविरूद्ध धर्माची लढाई”, राष्ट्रवादी निवडणुक आयोग सुनावणी प्रकरण