मुंबई : अलिकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सरन्यायधीश चंद्रचूड यांच्यावर टिका केली होती. दिल्लीतील पत्रकार डी. उपाध्यय यांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे अवमान याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईत झोमॅटो ची एन्ट्री”,पाहा आज काय काय घडलं ? पुढची सुनावणी कधी ?
राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत होता. यातच शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर निवडणुक आयोगावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिका केली होती. यातच दसरा मेळाव्याच्या भाषणात त्यांनी सरन्यायाधीस चंद्रचुड यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यावरून आता डी. उपाध्यय यांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांना पुण्यात दाखवले काळे झेंडे, पोलिसांनी युवकांना घेतले ताब्यात
उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाची आणि सरन्यायाधीशाच्या कार्यपद्धतीची बदनामी केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, अशा याचिकेमुळे काही फरक पडणार नाही, यामुळे एका सामाजिक प्रश्नाला वाचा फुटेल, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटातील अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता पोहचला शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंनी दिवाळीत केला डबल धमाका,” राज्य सरकारवर साधला निशाणा
हेही वाचा…“अधर्माविरूद्ध धर्माची लढाई”, राष्ट्रवादी निवडणुक आयोग सुनावणी प्रकरण
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हात आहे की नाही? पोलिस महासंचालकांनी दिली मोठी माहिती
हेही वाचा…“तर अजित पवारांवर तात्कळ गुन्हा दाखल करा,” आयोगाच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाची मोठी मागणी