पुणे : आज म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या इमारतीचं उद्घाटन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राऊत यांनी, “पुणे महापालिकेतही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवायला हवा”, अशी शिवगर्जना केली आहे. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, मग महापालिकेतही तेच हवं”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
जावयाला समोर बसवून खडसेंची, ईडीकडून ९ तास मॅरेथॉन चौकशी; काय घडले, वाचा सविस्तर
“आपण राज्यात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरताना दिसत आहे. अशाच प्रकारे आता, राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी झेंडा फडकला पाहिजे,” असं म्हणत त्यांनी, “आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं. आता आम्हाला काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा,” असा सल्ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
यावेळी, फडणवीसांवर टीका करताना त्यांनी, “मी पुन्हा येईल. मी दिल्लीत असलो तरी, माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन,” असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच, त्यांनी महापौरांवरही निशाणा साधत, “महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. त्यांनी खरंतर सगळीकडे जायला हवं. पण कदाचित त्यांना असं वाटत असेल की राज्य आपल्या हातात आलं आहे,” असा टोला लगावला आहे.
तसेच, “पुण्यात आपण महाविकास आघाडी बनवू, वाटाघाटी करु, एकत्र चर्चा करु, आम्ही काही ८० जागा लढवू शकत नाही का? सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहे. मुख्यमंत्र्यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे, याचा फायदा महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला नक्कीच होणार आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन