मुंबई : कालच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर, आज राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे भाजप नेत्यांनी बैठक बोलावली होती, तर आज दुसरीकडे, शिवसेनेच्या राज्यभरातील सगळ्या जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीला खासदार अनिल देसाई यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपास्थित होते.
यावेळी, शिवसैनिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी, “तुम्ही आघाडी किंवा युती होणार का? याची चिंता करत बसू नका. तुम्ही फक्तं जनतेसाठी आणि शिवसेनेसाठी कामं करा. आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा,” असा आदेश देत त्यांनी, “महामारी काळात शिवसैनिकांनी चांगलं काम केलं. आता इथून पुढे सर्व शाखा प्रमुखांनी, प्रत्येक गाव महामारीमुक्त करण्याचा प्रण करा. आपण सत्तेत आहोत. प्रत्येक स्तरावर पक्ष संघटना बळकट करा, मी तुमच्या पाठीशी आहे,” अशी हिंमत दिली आहे.
पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे
मुख्यमंत्र्यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. त्यावेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवसेना राज्यभर “शिवसंपर्क मोहीम” सुरू करणार आहे. ही मोहीम येत्या १२ ते २४ जुलैपर्यंत राबवली जाणार असल्याची माहिती आहे. तसेच, “माझं गाव, कोरोना मुक्तं गाव” यासाठी, घराघरामधून शाखा प्रमुखांनी जनतेची माहिती घ्यावी. लसीकरण झालं आहे कि नाही पाहावं, काही अडचणी असतील तर त्या सोडवाव्यात, विकासकामं वेळॆवर आणि योजना लोकांपर्यंत पोहचत आहेत का? याची माहिती घ्यावी,” असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
Read Also :
- मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन
- भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले