मुंबई : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळ फेरबदलात, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला, काहींच्या खात्यात फेरबदल झाले, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे.
राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! मात्र आमच्या शुभेच्छा!
दरम्यान, काही दिवसांपासून जेव्हा या विस्ताराच्या बातम्यांना सुरुवात झाली, तेव्हा राज्यातून मंत्रिपद कुणाला मिळणार, कोण कोण असणार मंत्रिपदाचा चेहरा याबाबत बर्रेच अंदाज सांगितले जात होते. यात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नावही त्यांपैकीच एक होते. मात्र, ४३ नवीन मंत्र्यांच्या यादी जेव्हा जाहीर झाली. तेव्हा, त्यात प्रीतम मुंडे यांचे नाव नसल्याने, मुंडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली.
भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले
यातच, प्रीतम मुंडे यांचा ओबीसींचा चेहरा म्हणून याही मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने, मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा माध्यमांतून रंगवली जात होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज, नाशिकमध्ये असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी, नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळ्यानंतर माध्यमांशी, तसेच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे भगिनींच्या अनुषंगाने त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस चांगलेच तापलेले दिसले.
पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे
“कोण म्हणतं? मुंडे भगिनी नाराज आहेत, तुम्हाला कुणी असं सांगितलं का? कृपा करून कारण नसतान, त्यांची बदनामी करू नका. पक्षात सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. त्यामुळे, योग्यवेळी निर्णय होत असतात. नारायण राणे यांना, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले आहे. ते चांगल्या प्रकार काम करतील,” असं म्हणत नाराज असल्याचे वृत्त फेटाळले आहे.ही फडणवीस म्हणाले.
Read Also :
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- शरद पवार आणि दिलीप कुमारांच्या मैत्रीत संजय दत्तमुळे निर्माण झाला होता दुरावा
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन