दिल्ली : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळ फेरबदलात, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला, काहींच्या खात्यात फेरबदल झाले, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे.
‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
दरम्यान, राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार या ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. मात्र, खातेवाटपाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. यात राणेंवर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
यावर आता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, ”भारती पवार, कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसची उत्पादनं आहेत, तर राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! त्यांना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी. मात्र, तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा! भाजपने शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला, त्यामुळेच त्यांना आत्ताच्या मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले,” अश्या उपाहासात्मक शब्दांत त्यांनी राणेंना आणि भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.
नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
त्यांच्या टीकेला आता, नारायण राणे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले असून, आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “खातं कोणतंही असो, ते छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा या खात्याचा कार्यभार पाहिन आणि या खात्याला न्याय देईन, तेव्हा राऊतांना लक्षात येईल, हे खातं किती महत्त्वाचं आहे,” असं वक्तव्य करत, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मला अभिनंदनाचे फोन आले, शरद पवारांचाही फोन येऊन गेला, पण मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपद मिळाल्यानंतर अभिनंदनाचा फोन केला नाही. हरकत नाही, त्यासाठी मन मोठं असावं लागतं. ठाकरेंचं मन एवढं मोठ नाही,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.
Read Also :
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन
- राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! मात्र आमच्या शुभेच्छा!
- भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले
- पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे