मुंबई : भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना, मंगळवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. यांनतर तब्ब्ल १३ तास कसून चौकशी केल्यानंतर, ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्यांची रवानगी १२ जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर ईडीने, खडसेंनाही समन्स बजावलं आणि सकाळी ११च्या सुमारास ते कार्यालयात दाखल झाले.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज? अन् संतापलेल्या फडणवीसांनी पत्रकाराला…
दरम्यान, ईडीने तब्ब्ल ९ तास खडसेंची चौकशी केली असून, अटकेत असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना समोर बसवून, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, ४ कथित कंपन्यांतून ‘बेसकोम बिंट्कॉन’ कंपनीमार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, या मॅरेथॉन चौकशीनंतर, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर, खडसेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं आणि थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले.
‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
यांनतर, त्यांच्या वकिलांनी माध्यमांसमोर येऊन, या चौकशीबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खडसेंची आजची चौकशी पूर्ण झाली आहे. आम्ही ईडीला सर्व प्रकारचं सहकार्य दिलं आहे. त्यांच्या संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे. ईडीला जी कागदपत्रे हवी होती, ती देण्यात आली आहेत. इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी, १० दिवसांचा कालावधी मागितला आहे. पुढेही जेव्हा चौकशीसाठी आम्हाला बोलावण्यात येईल, तेव्हा आम्ही हजर राहू,” असं ते म्हणाले आहेत.
आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
काल समन्स बजावल्यानंतर माध्यामांना प्रतिक्रिया देताना खडसेंनी, “हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे; की तो आपला आहे, जमीन मालकाला त्याचा मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. “कुछ तो होने वाला है”, असे संदेश जळगावात फिरत आहेत. पाच वर्षांपूर्वीचे जुने प्रकरण पुन्हा काढून, मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी पक्षबदल केल्याने माझ्यामागे ईडी लावण्यात आली आहे, नक्कीच मला यामागे कुठेतरी राजकीय वास येत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे
दुसरीकडे, जावई आणि खडसेंनंतर, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत असून, त्यांनी ईडीकडे निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ वाढवून मागितली आहे. मात्र, त्यावर अजूनही ईडीने प्रतिसाद दिलेला नाही.
Read Also :
- मोठी बातमी! “तुम्ही आघाडी किंवा युतीची चिंता करू नका, तुम्ही फक्त…”; मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश
- ‘राम’भक्त मोदींनी नव्या मंत्र्यांना घालून दिली ‘लक्ष्मण’रेषा, या ३ तत्त्वांच्या पलीकडे जाल तर, खबरदार!
- आंबिल ओढाच्या बेकारयदेशीर कृतीची चौकशी करा; नितिन राऊत यांनी घातले पुणे महापालिकेच्या कारभारात लक्ष
- राऊतांच्या टीकेला राणेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले संजय राऊतांना लवकरच कळेल…
- प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांनी स्वीकारला पदभार