कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदीता माने, खासदार धैरशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि इतरही दिग्ग्ज नेत्यांनी जिल्हा बँकेकरिता एकमेकांच्या सोबत तर काहींनी विरोधात शड्डू ठोकले होते.
हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
आता महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेनेने स्वतंत्र पॅनेलची घोषणा करत महाविकासमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही काँग्रेससह भाजप व मित्र पक्षांनी ही निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला.
“मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नाही”; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती. काँग्रेसचे नेते बंटी पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांनी ही मोट चांगल्या पद्धतीने बांधली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि नंतर महाराष्ट्रात हा पॅटर्न राबविला जाणार असं देखील बोललं जात होतं. मात्र कोल्हापुरात या पॅटर्नला सुरुंग लावण्यात आला आहे. शिवसेनेने सत्तारूढ गटाकडे सुरूवातीला राखीव गटातील नऊपैकी पाच जागांची मागणी केली होती; पण यापैकी तीनच जागा देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दर्शवली होती.
आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचचं नाव बदलणार का? निलेश राणेंचा संतप्त सवाल
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी गेल्या आठवड्यातच बँकेत सेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वतंत्र पॅनेल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाच जागांचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडे देण्याची सूचना खासदार संजय मंडलिक यांच्याकडे केली होती. याबाबत प्रा. मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर स्वतः प्रा. मंडलिक व महिला प्रतिनिधी गटातील श्रीमती निवेदिता माने यांची अशा दोनच जागा देण्याची तयारी दर्शवली. इतर जागांबाबतची चर्चा दहा तासाहून अधिक काळ बैठक होऊनही फिसकटली.
Read also:
- अखेर भास्कर जाधवांना देवेंद्र फडणवीसांनी झुकवलं; भर सभागृहात जाधवांनी मागितली माफी
- विधानसभेत राडा! भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल, फडणवीसांकडून निलंबनाची मागणी!
- तीन दिवसांच्या विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार महेश लांडगेंचे तीन महत्त्वाचे मुद्दे..!
- हिवाळी अधिवेशन 2021: भाजपकडून अध्यक्षांना अर्ज; 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी विनंती
- काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; नाना आणि भाईंमधील अबोल्याच्या सर्वांना आला अंदाज..