मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यात सध्या बराच गदारोळ चालला आहे. राज्यातील राजकीय नेते यावरून एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यामुळे महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या राज्याला आता हिंदुत्वाचा मुलामा देण्याची वेळ राज्यकर्त्यांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
“खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
शिवसेनेचा मराठवाडा वर्धापनदिन 8 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे राजकीय सभा आयोजित केली आहे. ज्याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलिकडेच सभा झाली होती. त्याच मराठावाडा सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. त्यामुळे सध्या औरंगाबादमध्ये जो औरंगाजेबाच्या कबरीवरून राजकीय वांदग उठलं आहे. त्यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
बाबरी मशीद पडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्या मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमीसोबत सत्तेचा पाट का मांडला? संभाजीनगरला सेनेचा विधानपरिषदेचा आमदार एमआयएमच्या नगरसेवकांची मदत घेऊन का करावा लागला? उत्तर संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी देणार का ? असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून भाजपने औरंगजेबच्या कबरीवरून भाजप आणि मनसेने राज्य सरकारविरोधात रान पेटवलं आहे. औरंगजेबची कबर उद्धवस्त करू, असा इशारा दिल्यानंतर त्या कबरीला सरंक्षण देण्यात आलं. त्यावरून मनसेने राज्य सरकारवर जोरदार टिका केली. तसेच औरंगाबादमध्ये पाण्याच्या प्रश्नावरूनही भाजपने जल आक्रोश आंदोलन करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जून रोजी होणाऱ्या सभेत यांचा कशाप्रकारे समाचार घेतात ते आता पहावं लागणार आहे.
Read also:
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले