मुंबई – येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी चुरस वाढणार आहे. सहाव्या जागेसाठी एक एक मतदान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजपची सर्व मदार अपक्षांवर आहे. जास्तीत जास्त अपक्ष आपल्यासोबत राहावेत म्हणून दोन्ही पक्षांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
मात्र, असं असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला दुसरी चिंता सतावत आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची. हे दोन्ही नेते तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून आम्ही आवश्यक कार्यवाही करणार आहोत, असं स्पष्ट केलं. तसेच याबाबत आम्ही कोर्टात धाव घेणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं.
पटेल म्हणाले की, अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहोत, असं पटेल यांनी सांगितलं. मलिक आणि देशमुख यांना मनीलॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दोघेही ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
“दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांच्या मतांचा विचार केल्यास आमचे चारही उमेदवार सहज निवडून येतील, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. ३२ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. या काळात देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि समर्थक अपक्ष सदस्यांच्या मतांचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही.
Read also:
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”