पुणे : देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत अलिकडेच टाळगाव चिखली याठिकाणी पार पडली. भाजप आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी ही बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थित या बैलगाडा शर्यतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसने मोठ्या बक्षीसांची लयलुट केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
बैलगाडा शर्यतीत जवळपास 2 कोटी रूपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रावादी काॅंग्रेसचे प्रदेश सचिव असलेले मावळातील रामनाथ वारिंगे यांचा बैलगाडा पहिल्या क्रमांकात आल्याने त्यांना 25 लाखांचे बक्षिश म्हणून जेसीबी देण्यात आला. तर मावळातील बाबुराव वायकर यांचा गाडाही पहिल्या नंबरात बसला. त्यांनी नुकतीच टर्म संपून प्रशासक लागू झालेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन सभापती आहेत.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
दुसऱ्या क्रमांकावर मावळचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सुनील शेळके या गाडा आल्याने त्यांना 12 लाख रूपयांचा बोलेरो जीप बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच शेळके यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून बैलगाडा घाटातच त्यांची जंगी मिरवणुक काढण्यात आली. भाजपच्या घाटात हा राष्ट्रवादीचा जलवा असला. तरी राजकारणापालिकडे जाऊन मी त्याकडे पाहतो. अशी संयमी आणि बैलगाडा मालकाला शोभणारी राजकारणविरहित प्रतिक्रिया शेळकेंनी दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. अहोरात्र मेहनत घेवून महेशदादा यांनी मंत्रालय, सर्वोच्च न्यायालात परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.
“जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१७ पर्यंत एकाही राज्यकर्त्याने बैलगाडा शर्यत सुरू व्हावी. याकरिता राज्य शासनाचा एक रुपयाही खर्च केला नाही. खंडोबाची शप्पत घेवून सांगतो… फडणवीस यांनी प्रत्येक सुनावणीला होणारा सुमारे २०लाख रुपयांचा खर्च कसा उभारायचा? असा प्रश्न होता. त्यावेळी फडणवीस यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर आम्ही बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. पण, फडणवीस यांनी कधी श्रेय घेतले नाही.
Read also:
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
- “खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?