मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या आंदोलनाप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गु्न्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते. मनसेने याप्रकरणी त्यांच्या जामीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यांच्यावर आज सुनावणी झाली असून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे.
“पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला, मात्र काही अटी घालण्यात आल्य़ा आहेत. येत्या 23 मे रोजी त्यांना सकाळी 11 ते 2 या वेळेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करावे असंही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणाचा जोपर्यंत तपास होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि 16 तारखेला त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या चौकशीला समोरं जावं लागणार आहेे, असं सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांनी तपासाला सहकार्य न केल्यास त्यांचा अटकपुर्व जामीन रद्द करावा , यासाठी पोलीस न्यायालयात देखील जाऊ शकतात. असंही प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे. या दोघांना जामीन अर्ज मंजूर होताच मनसे नेते गजानन काळे यांनी एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हर जोर जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपुर्व जामीन मंजूर असं त्यांनी म्हटलं आहे.
“पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
दरम्यान, मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची कायदेशीर लढाई लढण्याची वकिलांनी मदत केल्याने शिवतीर्थावर अलिकडेच राज ठाकरे यांची जवळपास 50 वकिलांनी भेट घेतली होती. तसेच त्यांचे कौतुक देखील केले होते.
Read also:
- नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
- “तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
- “रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत