मुंबई : देशात मान्सूनच्या सरींनी शिडकावा करायला सुरुवात केली असली तरी, राज्यात मात्र मान्सून सरींनीं अजून हवा तेवढा जोर धरलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणीच्या कामांना सुरुवात करू नये, अशी महत्वाची सूचना कृषी विभागाने राज्यभरातील शेतकऱ्यांना केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याभरात सगळीकडे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरादार हजेरी देखील लावली आहे. तसेच, यंदाचा उन्हाळाही फार मोठ्या प्रमाणात जाणवला नाहीये. त्यातच मॉन्सूनचे देखील लवकर आगमन झाले. मात्र, या निसर्गाच्या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेकदा हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. यंदाही हा निसर्गाचा लपंडाव पावसाच्या रूपाने सुरुच असून, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने, तसेच राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनीही शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई अजिबात करू नये, अशाप्रकारचे आवाहन केले आहे. ‘राज्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आणि ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला तरच लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. राज्यात साधारण १७ जूननंतर मान्सून सुरळीतपणे पडण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
Read Also :
- बंगालनंतर अजून एका राज्यात भाजपाला सुरुंग; प्रभावशाली नेता भाजप सोडणार
- सरकार आमच्या भरोश्यावर; आम्ही सरकारच्या नाही; नाना पटोलेंचे ट्टिट
- अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
- ‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार
- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील ‘या’ दिग्गजांना मिळणार स्थान?