मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे हादरे बसले आहेत. शिवसेनेचे तब्बल ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची वाट सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर कारण काल सांगोल्यात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आमच्यासोबत 18 खासदारांपैकी 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.
“कारण रिक्षाला बुलडोझरनेच ओढलं जातंय”; ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
लोकसभेत शिवसेना संसदीय पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून शिवसेना खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे. तर खासदार भावना गवळी यांची उडलबांगडी केली आहे. भावना गवळी यांनी अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाथ उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. या पुढे शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.
“अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
१८ जुलै, २०१२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. हया पदासाठी यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. द्रौपदी मुर्मू ह्या आदिवाशी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. द्रौपदी मुर्मू या राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरूवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे. असंही त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
“ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. शिंदे गटात आता खासदार, नगरसेवक, महापौर, आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आता जोरदार बैठक सत्रं सुरू केल्या आहेत.
Read also
- “माझ्यामुळेच शिंदेंना आमदारकी मिळाली, नाही तर त्यांनी आईवडिलांची शपथ घेऊन सांगावं”
- आता ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून; भाजपच्या वेगाने हालचाली सुरू
- “सेनेचा आक्रमक नेता गावाकडे जाऊन करतोय शेती”; अधिवेशन संपल्यानंतर लगेच धरली गावाकडची वाट
- “तर राजकारण सोडून देईन”; बंडखोर आमदार शंभुराजे देसाईंचं मोठं वक्तव्य
- “शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही”