नवी दिल्ली : काल झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. कारण काॅंग्रेसच्या हातून दोन राज्य सुटले असून मध्यप्रदेशात भाजपने आपली सत्ता राखली आहे. यातच राजस्थानमध्ये सत्ताबदल झाला असून काॅंग्रेसचा याठिकाणी मोठा पराभव झाला आहे. यातच आता राजस्थानमध्ये कोण मुख्यमंत्री होणार ? याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने १९९ विधानसभा जागांपैकी ११५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी काॅंग्रेसच्या वाट्याला फक्त ७० जागा मिळाल्या आहेत. यातच बसपाला २ तर अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत राजस्थानमध्ये सत्ता बदल होत आली आहे. त्यामुळे याही निवडणुकीत सत्ता बदल झाली आहे.
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
राजस्थानमध्ये काॅंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामाना करावा लागल्यानंतर आता काॅंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजभवनावर आपला राजीनामा सादर करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता भाजपकडून राजस्थानच्या राजघराण्याच्या सदस्या दिया कुमारी या मुख्यमंत्री पदाच्या शर्यरीत आल्या आहेत. त्यांनी काॅंग्रेसचे सीतारमन अगरवाल यांच्यावर ७१ हजार ३६८ मताधिक्यांने विजय मिळवला आहे. याआधी २०१३ साली त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या लोकसभा निवडणुक जिंकल्या होत्या.
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
दरम्यान, दोन ठिकाणी भाजपाचं राज्य होतं. तिथे त्यांनी अदिक लक्ष केंद्रीत केलं होतं. राजस्थानमध्ये काॅंग्रेस पाच वर्षे सत्तेवर होती. तिथे नव्या लोकांना संधी देऊ असं राजस्थानच्या लोकांना वाटलं. त्याला साजेसे आत्ताचे कल दिसत आहेत. हे कल आहेत निकाल नाहीत. हे लक्षात घ्या. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…मिझोरममध्ये सत्ताबदलाचे संकेत, विरोधी पक्ष बहुमताच्याजवळ, भाजपच्या वाट्याला किती ?
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल